शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी अग्नीशमन केंद्र उद्घाटनाच्या आशा पल्लवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:37 IST

एमआयडीसीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  अग्निशमन केंद्राला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही या अग्नीशमन केंद्राची इमारत वापराविना पडून आहे.

ठळक मुद्देया केंद्राचा, निवासी इमारतींचा वापर होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. अन्य शासकीय कर्मचाºयांना ही निवासस्थाने वापरण्यासाठी दिली जातील, असे संकेत

रत्नागिरी : एमआयडीसीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  अग्निशमन केंद्राला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही या अग्नीशमन केंद्राची इमारत वापराविना पडून आहे. याठिकाणी कर्मचाºयांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या केंद्राला जिल्हाधिकारी यांनी भेट दिल्याने केंद्राच्या उद्घाटनाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या छोट्या-मोठ्या ७ उद्योग वसाहती आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात कोणताही अपघात घडल्यास त्यासाठी अग्नीशमन यंत्रणा सुसज्ज राहावी यासाठी जिल्ह्यात अग्नीशमन केंद्राची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. त्यानुसार रत्नागिरी एमआयडीसीमधील जागेत अग्नीशमन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे सव्वाचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या इमारतीमध्ये अग्नीशमन केंद्र तसेच कर्मचाºयांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. 

दोन वर्षांपूर्वीच या इमारतीचे काम पूर्ण झालेले असताना, तिचे उदघाटन का रखडले, याची  प्रत्यक्ष खातरजमा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. इमारतीची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली. अग्नीशमन यंत्रणेसाठी सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून, त्याच्याच बाजूला तीन इमारतींमध्ये कर्मचाºयांसाठी प्रशस्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे २४ ते २५ फ्लॅट उपलब्ध असून, त्यांचेही उदघाटन झालेले नाही. या केंद्राचा, निवासी इमारतींचा वापर होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत प्रत्यक्ष पहाणीवेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिकाºयांकडे विचारणाही केली. 

आता लवकरच या इमारतींचे उदघाटन केले जाणार असून, कर्मचारी निवासाचीही सोय केली जाणार आहे. तसेच जर अग्नीशमन कर्मचारी उपलब्ध नसतील तर अन्य शासकीय कर्मचाºयांना ही निवासस्थाने वापरण्यासाठी दिली जातील, असे संकेत जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी